Thursday, April 19, 2012

Kolkata dairy -1

कुठल्याही शहराची पहिली ओळख तिथे आपले "आगमन" कसे होते त्यावर अवलंबून असते. "first impression " बद्दल जगात  खूप  काही  बोललं जातं  ते  उगाच  नव्हे.कलकत्त्याच्या "नेताजी सुभाष चंद्र बोस " airport  वर  आम्ही  उतरलो  खरा ...पण  आकाशातून  पडून  धाडकन  जमिनीवर  आदळलो  ते मात्र डासांमुळे .....डास  डास  आणि  फक्त  डास  .तिथे  west bengol goverment व्यतिरिक्त  फक्त  डासंचेच  साम्राज्य  होते .इतके  डास  मी  आजपर्यंत  कधीच  पहिले  नाही . एक क्षण सुद्धा  "न  हलता"  आपण  उभे  राहू  शकत  नाही ..दोन्ही  हातानी  फक्त  डास  मारायचंच  काम  करावा  लागत  होतं  ..तेसुद्धा  taxi   आपल्याजवळ  येईपर्यंत ...दोन्ही   पाय  जागच्या  जागी  नाचावावे  लागत  होते ...horrible it was. तरीसुद्धा  डास  चावालेच .....taxi  मध्ये  बसलो  तर  taxi  च्या  आत  मध्ये  पण  डास ....गाडी  सुरु  झाली  तरी  पण  डासांपासून  सुटका  होत  नव्हती ....जरा  दूर  आल्यावर  गेले  डास ...कलकत्त्याला  येताना  सगळे  जण  please odomas घेउन   या ...उतरायच्या  आधी  विमानातच  लावा  म्हणजे  तुमचा  रक्षण  होईल ...असो .


कलकत्त्याची life  line  "Taxi " म्हणजे  technology  ला  आव्हान  आहे ..कोणी कितीही talented  lastest design काढले  तरी  पुण्याच्या   "टमटम " ला   आणि  कोलकात्याच्या  taxi ला तोड नाही . दार  नक्की  लागला  असेल  कि  नाही  असा  विचार  करेपर्यंतच  आमचे  घर  आले  म्हणून  वाचले .कधीही  तुटू  शकेल  अशी  दारं  taxi ला  लावली  आहे  असं  वाटते . अगदी  खिळखिळी  झालेल्या  गाडीत  आपण बसायचे आणि ती मात्र भरधाव वेगाने धावणार...तोंडात फक्त रामाचे नाव घ्यायचे .....खाली रस्त्यावर taxi येत असली कि तिचा खुळखुळा चा आवाजच अगोदर  येतो. ..पण  आश्चर्य  म्हणजे  ह्या  taxi ला  काहीच  होत  नाही ..बिनधास्त  पणे  रस्त्यावर  धावत  असते  ..आणि अश्या  असंख्य  taxya ...त्यांचा रूप म्हणजे जाडजूड पिवळा डबा  "ambessador "...काही काही पांढर्या taxi  पण आहेत..पण दोघांमधला difference  मला अजून नाही माहित   ......"मीटर  च्या  दुप्पट  + 2 रुपये  extra " असं  भाड्याचं  calculation आहे .....driver मीटर  टाकतात  हेच  का  थोडे  आहे ......

इथला आणखीन  एक  challenging item म्हणजे  "सायकल  रिक्षा"........काय  तिचं  ते  रूप  आणि  काय ते  चालवणारी माणसे  .जिथे  मेट्रो  ने  एवढे  शहर  cover केले  आहे  तिथे  हि  सायकल  रिक्षा  एवढी  चालते ..किती  हा  विरोधाभास ..इंडिया  आणि  भारत .......बसायला  जागा  म्हणजे  "दीड  माणूस"  बसेल  इतकी ..सीट पूर्णपणे  horizontal नाही ,जरा  पुढे  कललेले ..म्हणजे  आपण  बसलो  कि  सारखं  वाटत  राहत   आपण  घसरून  पुढे  पडूनच  जाऊ ..मागे  टेकायला  पण   काहीच  नाही ..तुमचा  balance तुम्ही  किती  "skillfully" करता  ह्यावरच  सगळं  depend असतं  ...चढायला  सोपं  आहे  पण  उतरायला  ..."कठीण  कठीण  कठीण  किती "...मला  तर  आधी  कळतच  नव्हते  कसे  उतरायचे ....चांगलं लागलंच  माझ्या पायाला ......पण  आता  शिकले ...आपण  लहान  मुल  असताना  भिंत  कशी  उतरायचो ..तसं  उतरणं  सोपं  असतं ...साडी  नेसून  ह्या  बायका  कशा  चढतात उतरतात  देव  जाणे  .....मी  आणि  आदित्य  एकदम  नीट  बसतो ..पण  हातातली  purse   आणि  एखादी  bag   असेल  तर  अवस्था  वाईट  होते . मी  आदित्य  आणि   अमित  म्हणजे  "बसून  दाखवा " competition असते ...नवीन  नवीन  एक  दोनदा  आम्ही  असं  try मारला .....आता  एक  तर  दोन  रिक्षा  करू  किंवा  गाडीच  नेऊ ...जवळची  अंतर  taxi येत   नाही  ..मग सायकल  रिक्षाला  पर्याय  नसतो .thats  how they make business.                  


                                                                                                                ...................Continue







Thursday, February 23, 2012

Wakad Bridge


Few years back................
There were lines of cars used to wait under Wakad bridge to turn right side and join hightway in a lane of 3 where the road was just 2 lanes. People waiting at right turn as well as on highway waiting for the green signal were frustrated for the traffic, mismanagement of trafiic police, wrong design of wakad bridge , pune corporation.......
Corporation was not thinking thinking and finally came to solution.....They have constructed "Kala khadak chowk...Bhumkar underpass". They have restricted right tuning under wakad bridge and redirected it to Bhumkar underpass.
 
But people were smart....
People used to cross Wakad bridge and take illegal U-Turn which later made official U-Turn and joine highway. Also they were started using Bhumkar underpass.This story continued around 2 years....soon traffic chaos went out of control..........and finally traffic control came to decision.... "Open the right turn under Wakad Bridge"
 
Day 1
2,3 traffic police were standing at the start of wakad bridge redirecting people to turn right under bridge. Under bridge many traffic police were guiding vehicles... temporary they have removed the baricakes.... they have removed newly constructed drivider as well.......Wow what a smooth turning...i have reached highway in 10 mins from Phase 2.
 
Day 2
traffic police standing at wakad bridge and guiding to turn right under the bridge........with timings...."Right Turn" is open from 5 to 8pm.
 
.
.
.
.
Day 15
I have reached there at 5.40 but still baricakes were there.....i took my car to left side and joined highway via bhumkar underpass..When i reached Wakad , i saw police have removced the baricakes....i thought might be i have reached little early at Wakad bridge..
 
 
Day 18
I have reached wakad bridge at 5.40, still baricakes were there. Now i became smart and experienced. I didnt turn left. I was waiting there to open the "Right Turn".....Smart people also joined me in waiting the queue...and lots of vehicles pressurised traffic police to remove baricakes..
 
 
Day 23
5.30pm.... people were shouting at traffic police to open the right turn...switch on the signal.....showing by hands to remove baricakes ....taking there vehicles "Inch inch" ahead........ looking this scene ,vehicles  on high way stopped by themselves allowing right turning....People crossed the half side of road and reached upto drivider.....forcing traffic police to remove baricakes...........
.
.
.
.
.
.
.
.
 
 
Story continues.......................................
I am sure Soon we will reach out to situation where decision was made to restrict right turn under wakad bridge...................Enjoy :)
 
 
 
 
 

Wednesday, January 18, 2012

आठवणीतली संक्रांत


 
बालपणीचा काळ सुखाचा...खरं आहे हे.....नुकतीच आलेली संक्रांत मला दरवर्षी प्रमाणे बालपणाच्या आठवणीत घेऊन गेली.....आमच्या नाशिकला संक्रांत किती उत्साहात साजरी व्हायची .....सगळीकडे नुसता "गयी SSSSS  बोला SSS" चाच गजर असायचा ....कालानुरूप तिथेही बदल झाले... पण माझ्या मनात मात्र माझ्या लहानपणी साजरी व्हायची तशीच संक्रांत घर करून बसली आहे.

आमचे कुटुंब म्हणजे आई, नाना , आम्ही तिघी बहिणी आणि आमचा एकुलता एक भाऊ. त्याला भाऊ नसल्याच त्याचा दुख संक्रांतीला नेहेमी उफाळून यायचं.कारण कॉलनितल्या इतर मुलांचे धाकटे भाऊ त्यांची फिरकी पकडायचे आणि दादाला कोणीच नसायचं.त्यात दोघी बहिणी मोठ्या म्हणून त्या नाही. राहिले मी.माझ्यात आणि दादात ९ वर्षांचे अंतर त्यामुळे त्याची दादागिरी फक्त माझ्यावरच चालायची. सकाळ झाली कि लवकर अंघोळ करून दादा पहिले गच्चीवर पाळायचा.आमच्या बिल्डिंग मधला आणखीन एक मुलगा होता अमेय, ज्याला भाऊ आणि बहिण कोणीच नव्हतं.तो पण सकाळी सकाळी गच्चीवर हजार असायचा.दादाची उंच उंच उडणार पतंग थोडा वेळ का होईना हातात पकडायला मिळेल ह्या आशेने दादा गेला कि थोड्या वेळाने माझी स्वारी पण गच्ची वर जायची. मी सारखा त्याच्या मागे मागे  "दादा दे ना मला हातात पतंग"..  मग तो म्हणायचा "थांब अजून थोडी उंच जाऊदे"...पुन्हा ५, १० मिनिट झाले कि.."ए दादा देना २ मिनिट हातात"....मग तो मला त्याची चक्री पकडायला लावायचा..."थांब आता पेच होणार आहे.....तू बाजूला सरक".....आणि नेमका जर त्यावेळेस आकाशात पेच झालाच तर अमेय धावत धावात येऊन चक्री माझ्याकडून काढून स्वतःच्या हातात घ्यायचा. मग त्या दोघांचा "ढील दे ...ढील दे......खेच......आणखीन सोड....." सगळी आरडओरड सुरु व्हायची.....मग कधी आमची पतंग जायची आणि कधी दुसर्यांची......आमची पतंग गेली कि मांजा जितका मिळेल तितका ओढायचा ...मग मात्र हे दोघं मला मांजा चक्रीला गुंडाळायला बसवायचे.मी पण सगळा मांजा नीट गुंडाळून ठेवायची. मग नव्या पतंगीला मंगळसूत्र बांधायचं काम माझ्याकडे...तरीपण दादा cross  check  करायचाच ...मी नीट भांधालय कि नाही ते.....कधी कधी दुसरी पतंग आमच्या गच्ची वर येऊन पडायची....मग तिचा मांजा पण आम्हाला मिळायचा.....फाटलेली पतंग मिळाली कि तिला repair  करायचं...दादा मला खाली पाठवायचा,आई कडून भात आणायला...मग भाताने पतंगीचा कागद चिकटवून तिला repair करायचा कार्यक्रम व्हायचा......कधी कधी वारयाने सगळ्या पतंगी उडायच्या ..इकडे तिकडे जायच्या...मग हे दोघं मला परत कामाला लावायचे...मी सगळ्या पतंगी एकत्र गोळा करून त्यावर वीट ठेऊन द्यायची...आणि परत दादा मागे उभी रहायची..."दे ना मला पतंग हातात..."..खूप वेळ झाला कि द्यायचा हातात.....दादाची ती उंच उंच जाणार पतंग....उन्हात तिच्याकडे एकटक पाहून डोळ्यात पाणी यायचे...पण तरीही मला ती पकडायची असायची.....अगदी २ मिनिट ...लगेच काढून घ्यायचा.....खरं तर वाऱ्याच pressure  माझ्या हाताला पेलावायचं पण नाही....पण तरीही ..मला उंच उंच उडणारी पतंगच हवी असायची...कधी कधी अमेय पण त्याची पतंग पकडायला द्यायचा...पण त्याची पतंग फार उंच नाही जायची....मी किती वेळेस त्याची पतंग लांब जाऊन उडी मारून सोड्याचे....पण त्याला ती फार वर उडवताच यायची नाही...दादाला मात्र पतंग कोणी न सोडता अशीच हाताने ओढून भराभर उंच उडवता यायची.....पतंग उडवता येणं हे पण एक skill  च आहे...अनेक वर्ष प्रयत्न करून सुद्धा मला सुरुवातीपासून कधीच पतंग उडवायला जमली नाही.


इकडे खाली आईच्या तिळगुळाच्या पोळ्या सुरु असायच्या..dining  table  वर news  paper  पसरवून त्यावर एक एक पोळी करून आई सगळ्या पोळ्या मांडून ठेवायची. आई केवढ्या तरी पोळ्या करायची.....आणि त्याही न थकता.....आईचा हातच मूळी सढळ होता....एखादा अचानक आलेला पाहुणा सहज accomodate होऊन जायचा....वाढत्या वयातली चार पोर...आम्ही केवढा खायचो तेव्हा...आज विचार करून पण थक्क व्ह्यायला होतं .....आम्ही दिवसभर गुळाच्या पोळ्या खायचो....एक चक्कर kitchen  मध्ये मारली कि सारखं तोंड चालू असायचं...तिळाचे लाडू तरी.....नाहीतर वडी.....नाहीतर.पोळी......बापरे.......आणि येवढा खाउन सुद्धा आम्ही सगळे एकदम बारीक आणि सडसडीत होतो.आईच्या हाताची गुळाच्या पोळ्यांची चव...अहाहा!!! आजसुद्धा जिभेवर रेंगाळते...संक्रांतीला पोळ्या खाउन सुद्धा दुसर्यादिवशी पुरातील एवढ्या पोळ्या असायच्या....तिला कधी स्वयंपाकाचा त्रास झाला नाही आणि ती कधी थकलीहि नाही........एकसारख्या पोळ्या आणि एकसारख्या वड्या...तिची सर कोणालाच नाही..


दुपारची जेवणं झाली कि मग बिल्डिंग मधल्या सगळ्या काकवा आणि मोठ्या ताया पण गच्ची वर यायच्या...आता बायकांची majority  असायची.....आणि आईचं baking असल्यामुळे दादा मला पुष्कळ वेळेस पतंग हातात पकडायला द्यायचा.....दुपारचा हाच तो वेळ असायचा ज्यामध्ये मी माझी पतंग उडवण्याची सगळी इच्छा पूर्ण करून घ्यायचे.



सूर्य जसा पश्चिमेकडे झुकायला लागायचा तसा पोरांचा जीव खाली वर व्हायचा.....नोव्हेंबर, डिसेंबर पासून पतंग उडवायची practice  केलेली असायची...आणि आजचा हा last  day .....उद्यापासून पतंग उडवण्यात ती मजा राहणार नसायची...सगळी मुलं अगदी अंधार पडेपर्यंत पतंग उडवत असायची.. संध्याकाळ झाली कि आम्ही लहान मुलं मात्र आईने दिलेला छान ड्रेस घालून आपापल्या डब्यात तिळगुळ घेऊन तयार होऊन बसायचो.सगळे जमले कि एक एक करत सगळ्यांच्या घरी तिळगुळ द्यायला जायचो. आमच्या कॉलोनी मध्ये एकूण ४४ flats होते...काहीच 2BHK ..बाकी सगळे १BHK.. सगळेच जण मध्यम वर्गीय.....सगळ्यांचा घरचाच तिळगुळ....पण एकमेकांमध्ये खूप बांधिलकी होती....आम्ही अगदी प्रत्येक घरी जायचो....आणि आपल्याला मिळालेला तिळगुळ लगेच तोंडात टाकायचो...डब्यात नाही......काही काही काका आम्हाला chocklate  द्यायचे...infact  आम्ही मुलं येणार म्हणून खास आमच्यासाठी आणून ठेवायचे...काही काही काकूंच्या तिळाच्या वड्या किती tasty  लागायच्या.......अशी हि संक्रांत संपली कि रात्री मन फार उदास व्हायचा....संक्रांत संपली म्हणून...आता पुन्हा पुढच्या वर्षीच हे सगळं अनुभवायला मिळणार हि जाणीव मनाला मात्र फार हुरहुरायला लावायची....


आणि आता....ते सगळं परत कधीच मिळणार नाही......म्हणून हुरहूर.......कायमचीच.......दरवर्षीप्रमाणे मी पुण्यात असते.आणि माझे मन मात्र.......नाशिकला.....२० वर्ष मागे जाऊन बसते एकटेच........